घरातील कलश विषयी
आपण जो कलश आपल्या देव्हाऱ्यात आपल्या कुलदेवीसाठी / कुलदेवासाठी स्थापन करतो त्याविषयी माहिती ..
देवीच्या / देवाच्या नावाचा कलश म्हणजेच कुलदेवतेसाठी कलश सदैव स्थापन करायचा असेल तर रोज किंवा दर आठवड्यातून दोनवेळा मंगळवारी व शुक्रवारी किंवा निदान आठवड्यातून एकदा मंगळवारी / शुक्रवारी त्यातील पाणी बदलणे ..
त्या पाण्यात पुन्हा तेच सुपारी कॉइन टाकले तरी चालेल .
व त्याबरोबर कलशात
गंगाजल , इतर नदीचे जल , चंदन , अष्टगंध , हळद कुंकू , अक्षता , गहू दोन चार दाणे , कमलबीज , तीळ एवढा भीमसेन कापूर , दुर्वा , तुळशी पत्र , सुवर्ण – रजत वगैरे ,
यापैकी जे जे शक्य असेल उपलब्ध असेल ते कलशात टाकावे ..
काही काही वस्तू त्याच त्याच पुन्हा वापरल्या तरी चालतात..
आंब्याची – विड्याची पाने नसली तरी चालेल.
आधीचे पाणी सर्व घरात – भिंतीवर – कोपऱ्यांमध्ये – जमीन जागेत शिंपडू शकतात , ( थोडेसे अंघोळीला घेऊ शकतात ,) झाडात विसर्जन केल्यास उत्तम . कारण पायाखाली येणार नाही ..
नारळ दर महिन्याला बदलणे , एखादा दिवस फिक्स करणे —
पौर्णिमा / पंचमी / अष्टमी / नवमी पैकी कोणताही एक दिवस
देवीसाठी असेल तर …
देवासाठी असेल तर एकादशी / शिवरात्री / चतुर्थी / पौर्णिमा पैकी कोणताही एक दिवस ..
चुकून आपण ठरवलेल्या योजलेल्या दिवशी काही कारणाने ( अडचण – सोयर सुतक इत्यादीमुळे ) पाणी – नारळ वगैरे बदलता आले नाही तर ते अशौच सम्पल्यानंतर लगेच बदलावे ..
आणि जुना नारळ फोडून गोड करून खाणे .. चुकून खराब निघाला तर तो विसर्जन करावा , मनात काहीही भीती वाईट वगैरे आणू नये.
स्थापन केलेल्या कलशाला – वर नारळाला रोज हळद कुंकू फुल गजरा वगैरे अर्पण करणे .. जुने निर्माल्य काढून झाडात मातीत – पाण्यात वगैरे विसर्जन करावे.
जर चुकून कलशातील नारळाला कोंब आला तर जोपर्यंत शक्य असेल तो पर्यंत तोच ठेवावा , त्याला काळजीपूर्वक वाढवावा .. थोडा मोठा झाल्यावर आपल्या जागेत लावावा किंवा मंदिरात – परिचितांकडे जागा उपलब्ध असेल तेथे लावण्यासाठी द्यावा व काळजी घेण्यास सांगावे व स्वतःसुद्धा अधूनमधून देखभाल करावी.
चुकून नारळाला तडा गेला – सडला – सुकला वगैरे तर लगेच बदलावा , घाबरून जाऊ नये ..
सुतक – सोयर असेल तर ते संपल्यानंतर लगेच कलशातील पाणी वगैरे बदलणे , नारळ वगैरे बदलायचा वाटत असेल तर लगेच बदलू शकतात किंवा तोच वापरला तरी चालेल ..
कलशऐवजी नुसता नारळ – शहाळे कोणी कोणी ठेवतात त्यासाठी सुद्धा थोड्याफार प्रमाणात म्हणजे पूजन – बदलणे वगैरे वरील नियम लागू होतील ..
घरात एकापेक्षा जास्त कलश – नारळ स्थापन करू नये ..
श्री श्याम जोशी गुरुजी
टिटवाळा