अग्निहोत्र
अग्निहोत्र मंत्र
सूर्योदय
पहिला मंत्र :-
सूर्याय स्वाहा , सूर्याय इदं न मम
दुसरा मंत्र :-
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम
सूर्यास्त
पहिला मंत्र : –
अग्नये स्वाहा, अग्नये इदं न मम
दुसरा मंत्र :-
प्रजापतये स्वाहा, प्रजापतये इदं न मम
अग्निहोत्र विधी — अग्निहोत्र हा अत्यंत साधा, सोपा, सुटसुटीत सर्वांना आचरण्यास सुलभ विधी आहे. स्थानिक सूर्योदय-सूर्यास्ताच्या पांच ते दहा मिनिटे अगोदर अग्निहोत्र पात्रात गोवंशाच्या गोव-यांचा अग्नी तयार करावा. अग्नी प्रज्वलित करण्यासाठी शुद्ध कापूर , शुद्ध गुग्गुळ अथवा गाईच्या तुपात भिजवलेल्या फुलवातीचा उपयोग करावा .. शेण्या – गोवऱ्या ऐवजी शुद्ध गोमय धूप , हवन धूप, अग्निहोत्र धूप वगैरे धूप स्टिक्सचा सुद्धा वापर करू शकतात ..
छोट्या ताटलीत दोन चिमुट अखंड तांदुळास दोनचार थेंब गाईचे तूप टाकून आहुतीद्रव्य तयार करून ठेवावे. ठीक सूर्योदय व सूर्यास्ताची वेळ घड्याळाप्रमाणे झाल्याबरोबर एक एक आहुती एक एक मंत्र उच्चारून द्यावी .. अग्निहोत्र विधी झाल्यानंतर अग्नी आपोआप शांत होईपर्यंत अग्निहोत्र पात्र त्याच जागी ठेवावे. तोपर्यंत जप नामस्मरण करत राहावे.ध्यानस्थ बसावे , रोजचे मंत्रपठण , जप , साधना , प्राणायाम वगैरे करू शकतात.
त्यानंतर अग्निहोत्र पात्र सुरक्षित ठिकाणी उचलून ठेवावे.
अग्निहोत्र सुरू होण्या आधी व संपन्न झाल्यावर काही वेळ आपल्याला जे स्तोत्र मंत्र येतात ते म्हणावे किंवा ऑडिओ ऐकावे. इष्टदेवता , कुलदेवता जप नामस्मरण करावे ..
अग्निहोत्र वातावरणात शुद्धता वाढवते , मनावरील ताणतणाव दूर होऊन मनःशांती, प्रसन्नता व समाधान लाभते. अग्निहोत्र आचरणाने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढून स्वास्थ्य लाभते. अग्निहोत्र आचरणाने मनोबल वाढते. अग्निहोत्र वातावरणाने लहान मुले शांत व समाधानी होतात. त्यांची ग्रहण शक्ती वाढून ती अधिक एकाग्रतेने अभ्यास करू शकतात. चिडचिड , हट्टी व मतीमंद मुलावर अग्निहोत्र वातावरणाचा इष्ट शुभ परिणाम अनुभवास आला आहे. अग्निहोत्राचे शुद्ध व औषधी तत्वांनी युक्त वातावरण वनस्पतींच्या व प्राण्यांच्या संवर्धनास उपयुक्त आहे. अग्निहोत्र भस्म (रक्षा) आयुर्वेदानुसार औषधी गुणधर्मयुक्त आहे. बागेतील फळझाडे, फुलझाडे व शेती यासाठी अग्निहोत्र भस्म उत्तम खात म्हणून वापरता येते. अग्निहोत्र आचरणाने कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये स्नेहभाव प्रेम आदर उत्पन्न होतो .. कलह कमी होतात..
अग्निहोत्र भस्म , गंगाजल , गोमूत्र, समुद्रमिठ, हळद हे सर्व फुलपात्रभर पाण्यात एकत्र करून सर्व वास्तुमध्ये अंगणात वगैरे शिंपडावे ( रोज किंवा आठवड्यातून दोन तीन वेळा शिंपडले तरी चालेल ) यामुळे घरातील सर्व त्रास बाधा पीडा वाईट वातावरण कमी होऊन विशिष्ट शुभ ऊर्जा शक्ती वाढते .
श्री श्याम जोशी गुरुजी
श्री अंजनेरी मंगलाष्टक तसेच श्री महागणेश पंचरत्न स्तोत्र मी नित्य नेमाने सकाळी देवपूजा करतांना म्हणतो .
अग्नी होत्रही सुरू करायचे आहे. योग्य साहित्य कुठे उपलब्ध होईल कळले तर बरे होईल.
वेबसाईट वर आपली माहिती मला फार उपयोगी पडत आहे.धन्यवाद.
अग्निहोत्र साहित्य आपल्याकडे सुद्धा उपलब्ध आहे..
वरील माहिती लिहीतांना चुक झाली तरी कृपया “श्री अंजनेय मंगलाष्टक वाचावे”.