अक्षय तृतीया

अक्षय तृतीया माहिती उपाय तोडगे

साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय्य तृतीया म्हणजेच वैशाख शिधा तृतीया हा एक विशेष मुहूर्त आहे. हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे. कोणत्याही महत्वाच्या कामाचा व्यवहाराचा शुभारंभ , विवाह, गृहप्रवेश आणि धार्मिक कर्मे यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. ( वास्तुशांति विवाह वगैरे अर्थात इतर मुहूर्त बाबी तपासूनच ).. पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेतायुग सुरू झाले. भगवान परशुरामाचा अवतारही याच दिवशी झाला. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. विशेषत: या दिवशी माता श्रीलक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. अक्षय्य तृतीया हा एक अत्यंत शुभ मुहूर्त योग आहे. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य व त्याचे फळ कायम राहते, त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे. तसेच अक्षय तृतीया दिवशी खरेदी केलेले सोने चांदी वगैरे अलंकार किंवा इतर काही विशेष वस्तू कायम राहतात – टिकतात – वाढतात – आनंद देतात ..

त्यामुळे अक्षय्य तृतीयेला सोने, दागिने, वाहन किंवा कोणतीही नवीन वस्तू खरेदी केल्याने तुमच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी वाढते तसेच केलेली सर्व शुभ कार्ये , धार्मिक देवकार्य किंवा पितृ कार्य अनेक पटींनी शुभ परिणाम देतात.

अक्षय तृतीया दिवशी करण्यासाठी म्हणून काही विशेष उपाय तोडगे उपासना —

● अंघोळीच्या पाण्यात गंगाजल गोमूत्र चंदन भीमसेन कपूर यापैकी जे असेल ते टाकून आंघोळ करणे. आंघोळ करताना गंगा यमुना आदी तीर्थक्षेत्र स्मरण करणे..

● सकाळी व संध्याकाळी सर्व घरात गंगाजल गोमूत्र शिंपडणे.. धूप लावणे ..

● आपली कुलदेवता कुलस्वामी उपासना करणे.. तिच्या प्रित्यर्थ जप स्तोत्र पठण करणे..

● कावळ्याला , गायीला , कुत्र्याला , नदीत , पिंपळाखाली किंवा कोणत्याही झाडाखाली वगैरे अशा पाच ठिकाणी जे काही स्वयंपाक जेवण केले असेल त्या पदार्थांचा थीदा थोडा भाग घास करून देणे / अर्पण करणे ..

● लक्ष्मी विष्णू चे स्तोत्र नाम मंत्र वगैरे जे शक्य असेल ते पठण करणे , किंवा ऑडिओ श्रवण करणे..

● ब्राह्मणाला नऊ किंवा सात किंवा निदान पाच धान्य दान देणे , वस्त्र दान , शिधा , आंबा , माठ दान देणे .. ( या दिवशी प्रथम देव ब्राह्मणाला आंबे देऊन नंतर स्वतः आंबे खाणे अशी रीती परंपरा आहे )

● मंदिरामध्ये जाऊन देवाचे दर्शन घेऊन धूप दीप लावून इष्टदेवता स्तोत्र पठण करणे , नाम मंत्र स्मरण करणे , देवासमोर एक धान्य , फळ (आंबा नारळ ) , दक्षिणा अर्पण करणे ..

● श्रीसूक्ताचे अकरा एकवीस वेळा पठण करावे. महालक्ष्मीअष्टक सुद्धा चालेल.
● ॐ श्रीं श्रीयै नम:
या मंत्राचा ५ , ८ किंवा ११ माळा जप करावा.
● श्रीलक्ष्मीमाते सह भगवान श्रीविष्णूची पूजा करावी. भगवान विष्णूला चंदन , पिवळी फुले, पिवळी मिठाई आणि पिवळी फळे अर्पण करावे.
● ज्योतिष शास्त्रानुसार अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मंदिरात केळीचे झाड लावल्याने व्यक्तीचे वैवाहिक सुख वाढते.
● घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर हळदयुक्त पाण्याचा शिडकावा करावा. तसेच त्यात गोमूत्र गंगाजल असुद्या , यामुळे नकारात्मक ऊर्जा निघून जाते.
● या दिवशी पाणी दान केल्याने मानसिक वेदना दूर होतात. मातीच्या भांड्यात पाणी भरून माठ दान केल्याने व्यवसायातील अडथळे दूर होतात.
● या दिवशी आंब्याचे दान केल्याने आयुर्मान वाढते. सुख आनंद वाढतो ..
● या दिवशी विष्णु सहस्रनामाचे पठण अवश्य करावे. घरात सुख-समृद्धी नांदते. व भगवंताची कृपाप्रॉती होते ..

● वड उंबर पिंपळाच्या झाडाला वगैरे पाणी घालावे , त्याखाली तांदूळ साखर ठेवावे , जमल्यास पितृसूक्त पठण करावे , विष्णू स्तोत्र म्हणावे , पितरांसाठी मोक्ष सद्गति मागावी म्हणजे पितरांचा सुद्धा आशीर्वाद प्राप्त होतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!