श्री स्वामी समर्थ स्तवन

श्री स्वामी समर्थ स्तवन

नाही जन्म नाही नाम | नाही कुणी माता पिता | प्रगटला अदभुतसा | ब्रह्मांडाचा हाच पिता || १ ||
नाही कुणी गुरुवर | स्वये हाच सुत्रधार | नवनाथी आदिनाथ | अनाथांचा जगन्नाथ || २ ||
नरदेही नरसिंह | प्रगटला तरुपोटी | नास्तिकाच्या कश्यपूला |आस्तिकाची देण्यागती || ३ ||
कधी चाले पाण्यावरी | कधी धावे अधांतरी | यमा वाटे ज्याची भीती | योगीश्वर हाच यती || ४ ||
कधी जाई हिमाचली | कधी गिरी अरवली | कधी नर्मदेच्या काठी | कधी वसे भीमातटी || ५ ||
कालीमाता बोले संगे | बोले कन्याकुमारीही | अन्नपूर्णा ज्याचे हाती | दत्तगुरु एकमुखी || ६ ||
भारताच्या कानोकानी | गेला स्वये चिंतामणी | सुखी व्हावे सारे जन | तेथे धावे जनार्दन || ७ ||
प्रज्ञापुरी स्थिर झाला | माध्यान्हीच्या रविप्रत | रामानुज करी भावे | स्वामी पदा दंडवत || ८ ||
|| श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ, ॐ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ||

२८ स्तवने = १ मंडळ, अशी २८ मंडळे केल्यास संकट , अरिष्ट दूर होते. आपले पठण पूर्ण झाल्यावर किंवा निदान फलप्राप्ती झाल्यानंतर घरी ब्राह्मणाला बोलावून एखादे सत्कर्म ( स्वामी पूजन अर्चन – अभिषेक – होम हवन जे जमेल ते इत्यादी )   करावे.

||  श्री स्वामी समर्थ || 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!